(पाण्यामध्ये असलेला हायड्रोजन वायू वेगळा काढला जातो. त्याला ‘ग्रीन हायड्रोजन’ असे म्हणतात. तसेच नैसर्गिक वायूमधूनही ‘ग्रीन हायड्रोजन’ काढला जातो. याच्यामुळे प्रदूषण होत नाही.)

नवी देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ३० मार्च या दिवशी ‘ग्रीन हायड्रोजन’वर चालणार्या चारचाकी गाडीतून संसदेत पोचले. या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे. ‘मिराई’ याचा अर्थ म्हणजे भविष्य. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, ही गाडी लवकरच भारतात येणार असून त्यामुळे देशात मोठी क्रांती होणार आहे. आयात अल्प होईल आणि स्वावलंबी भारताचे आमचे स्वप्न नक्कीच साकार होईल. आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही पाण्यापासून सिद्ध होणारा ‘ग्रीन हायड्रोजन’ आणला आहे. ही गाडी प्रयोग आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन प्रारंभ होईल. त्यामुळे आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. भारत सरकारने ३ सहस्र कोटी रुपयांची योजना चालू केली असून आम्ही ‘ग्रीन हायड्रोजन’ निर्यात करणारा देश बनू. जेथे कोळसा वापरला जाईल तेथे आता ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरला जाईल.
Gadkari’s green new wheels—All about ‘Mirai’, India’s first hydrogen-powered FCEV @nitin_gadkari #Mirai #Hydrogen #NitinGadkarihttps://t.co/nGMKuPRFY9
— ET NOW (@ETNOWlive) March 30, 2022
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !