नेतेमंडळी पुष्कळ भांडत असली, तरी संकट येताच सर्व एकत्र येतात ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘सामान्य परिस्थितीत नेतेमंडळी भांडतात’, असे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वक्तव्य करणे, यांसारखी देशासाठी कोणती लाजिरवाणी गोष्ट नसेल ! नेतेमंडळींनी याचा विचार करून आपापसांतील भांडणे अल्प करून देशाच्या प्रगतीचा विचार करायला हवा ! – संपादक

‘स्वच्छतादूत’ आणि ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लोणावळा – भारतात सामान्य परिस्थितीमध्ये गल्लीतही भांडणे होतात. नेतेमंडळीही पुष्कळ भांडतात; मात्र संकट येताच सर्व एकत्र येतात, असे निरीक्षण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोंदवले. लोणावळा येथे ‘स्वच्छतादूत’ आणि कोरोना योद्ध्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार दिला. त्या वेळी ते बोलत होते.

कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात सर्वांनी एकत्र येत काम केले. यापुढे जाऊन संकट येऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. तसेच सर्वांनी नेहमी एकत्र रहाण्यासाठी प्रयत्न करायला हवा. असे झाले तर लोणावळा एक आदर्श निर्माण करेल, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.