पाकच्या सांगण्यावरून आम्ही भारताशी कधीही वाईट वागणार नाही ! – तालिबान

जबिउल्ला मुजाहिद

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानला पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानच्या विनंतीवरून तालिबान भारताशी कधीही वाईट वागणार नाही, असे विधान तालिबान सरकारचे प्रवक्ते तथा उप माहिती आणि सांस्कृतिक मंत्री जबिउल्ला मुजाहिद यांनी सांगितले. शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची हीच वेळ असल्याचे सांगत तालिबानची भूमिका मुजाहिद यांनी स्पष्ट केली. अफगाणिस्तानच्या दौर्‍यावर आलेले पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनाही त्यांचे भारताशी असलेले संबंध स्पष्ट करण्यास तालिबानकडून सांगण्यात आले आहे.