
नाशिक – जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल २७ काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. राज्यात ३ पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये अप्रसन्नता आहे.
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !