मध्यप्रदेशातील सुराना गावातील धर्मांधांच्या दहशतीला कंटाळून हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !

  • गावातील घर, शेती आणि संपत्ती सोडून पलायन करण्याची हिंदूंची चेतावणी

  • राज्याच्या गृहमंत्र्यांकडून हिंदूंना आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न

  • पोलीस अधीक्षकांनी हिंदूंनाच धमकावल्याचा हिंदूंचा आरोप !

  • भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • भारतात धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे ते उद्दाम झाले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक
  • तक्रार करणार्‍या हिंदूंनाच जर पोलीस अधिकारी धमकावत असतील, तर असे पोलीस भारताचे कि पाकचे ? पोलीस आणि प्रशासन हे नेहमीच हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, याचे हे उदाहरण. धर्मांधांवर कारवाई करण्यासह अशा औरंगजेबी वृत्तीच्या लोकांवर कारवाई केली, तरच हिंदू भयमुक्त होतील ! – संपादक
  • हिंदूंनो, असे सर्वत्र होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा ! – संपादक

रतलाम (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील सुराना येथील गावात धर्मांधांकडून केला जाणार्‍या छळाला कंटाळून तेथील हिंदूंनी धर्मांधांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. ‘आम्हाला साहाय्य न केल्यास आम्ही ३ दिवसांत आमचे घर, शेती आणि संपत्ती सर्व सोडून गावातून पलायन करू’, अशी चेतावणी हिंदूंनी या पत्राद्वारे दिली आहे. या गावाची लोकसंख्या २ सहस्र २०० इतकी आहे. त्यांपैकी ६० टक्के लोकसंख्या मुसलमान, तर ४० टक्के हिंदू आहेत. या पत्राची नोंद घेऊन रतलामचे जिल्हाधिकारी या गावाला भेट देणार आहेत. गावात धर्मांधांकडून हिंदूंना धमकावणे, त्यांना मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार नित्याचे झाल्यामुळे तेथील हिंदू दहशतीखाली वावरत आहेत.

राज्याच्या गृहमंत्र्यांकडून घटनेची नोंद !

डावीकडे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा

राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली असून ‘या प्रकरणी प्रशासनाशी चर्चा करू’, असे सांगितले आहे. ‘आमचा प्रदेश हा शांतीचा प्रदेश आहे. येथे कुणीही भय पसरवू शकत नाही’, असे सांगत त्यांनी गावातील लोकांना आश्‍वस्त केले आहे.

धर्मांधांकडून हिंदूंवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न !

‘या गावात पूर्वी हिंदू आणि मुसलमान मिळून मिसळून रहात होते; मात्र मागील २-३ वर्षांपासून धर्मांधांकडून गावातील युवकांना शिव्या देणे, त्यांना मारहाण करणे आणि त्यांना धमकावणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. गावात धर्मांधांची संख्या वाढल्यामुळे ते हिंदूंवर दबाव निर्माण करत आहेत’, असे गावातील हिंदूंचे म्हणणे आहे.

पोलीस अधीक्षकांकडून हिंदूंवर कारवाई करण्याची धमकी !

काही दिवसांपूर्वी गावात होणार्‍या या प्रकारांची माहिती हिंदूंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट देऊन दिली. ‘त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी आमचे घर पाडण्याची, तसेच आमच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली’, असा हिंदूंनी आरोप केला आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी !

हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच पोलीस महासंचालक यांना यांच्याकडे हिंदूंचा छळ करणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.