
सांगली, १८ जानेवारी (वार्ता.) – ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यात २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम २८ कोटी रुपये ९८ लाख १६ सहस्र रुपये असून यातून ८ सहस्र १४७ नळजोडण्या करण्यात येतील. ज्या गावांमध्ये यापूर्वी शासनाच्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहेत किंवा नाहीत त्यांची कार्यकारी अभियंता यांनी समक्ष भेट देऊन पहाणी करून प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात ‘जिल्हा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मिशन समिती’ची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी