|
|

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावरून केरळ उच्च न्यायालयाने संबंधित अधिकार्यांना कठेर शब्दांत फटकारले आहे. ‘कुणालातरी दुखापत झाल्यावर किंवा कुणी मेल्यावरच तुम्ही काम करणार का ? तुम्हाला रस्त्यांची दुर्दशा लाज वाटत नाही का ? कारण मला हे सगळे सांगतांनाच लाज वाटत आहे. कधीपर्यंत हे असेच चालत रहाणार ? ‘रस्त्यांची देखभाल कशी करावी’, हे जर अभियंत्यांना ठाऊक नसेल, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे’, अशा शब्दांत न्यायालयाने संबंधित अधिकार्यांना फटकारले. ‘न्यायालयाच्या सूचनांकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली’, असेही न्यायालयाने सुनावले.
“Do you feel no shame seeing this?” Kerala High Court pulls up authorities for poor condition of roads
report by @GitiPratap
Read story: https://t.co/mdsw0yVeEU pic.twitter.com/H1CYvjAlMr
— Bar & Bench (@barandbench) November 25, 2021
न्यायालयाने म्हटले की,
१. नेहमीप्रमाणे पावसाळ्यानंतर न्यायालयाकडे रस्त्यांविषयीच्या तक्रारी येण्यास प्रारंभ झाला आहे. हे फारच दुःखदायक आहे की, १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी न्यायालयाने याविषयी अगदी नेमक्या शब्दांत सूचना दिलेल्या होत्या; मात्र त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसत आहे. तथापि न्यायालय त्यांना इतक्या सहज या सूचना विसरू देणार नाही आणि जर ते विसरले असतील, तर त्यांना त्यांच्या वैधानिक अन् घटनात्मक कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करू.
२. संबंधित विभागाकडे जर कौशल्यपूर्ण अभियंत्यांची कमतरता असेल, तर बाहेर अनेक उच्चशिक्षित लोक आहेत, त्यांना संधी द्या.
३. प्रतीवर्षी रस्ता थोडाथोडा खराब होत होता. त्याकडे अधिकार्यांनी संपूर्ण दुर्लक्ष कसे काय केले ? जर तुम्ही रस्त्याकडे लक्ष ठेवून होता, तर तुम्हाला कळले ‘रस्ता कधी खराब झाला आहे ?’, हे कळले कसे नाही. स्वतः त्या रस्त्यावरून जातांनासुद्धा तुम्हाला लक्षात आले नाही का ?
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री