
‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे. कोणतीही कृती ‘धर्मशास्त्रप्रमाण’ असेल, तरच तिला हिंदु धर्माने मान्यता दिली आहे. याचे दैनंदिन जीवनातील सोपे उदाहरण म्हणजे ‘दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.’ हे कोणा व्यक्तीने सांगितलेले नाही; परंतु आजही बहुतेक सर्व हिंदू हा नियम पाळतात. धर्मशास्त्राने सांगितलेल्या अशा विविध कृतींतून मनुष्याचा मनोलय आणि बुद्धीलय होतो. त्यातूनच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होऊन तो जीवनमुक्त होतो.
सध्याचे बुद्धीप्रामाण्यवादी ‘संकुचित बुद्धी’लाच सर्वश्रेष्ठ समजत आहेत. त्यामुळे विविध बुद्धीअगम्य घटनांमध्ये त्याचे ‘का आणि कसे ?’, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यभर त्यातच अडकून जातात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)
‘साधकांना मायेत रममाण असणार्या व्यक्तीच्या सहवासात रहायला आवडत नाही, तसेच देवाला साधना न करणार्या व्यक्तीच्या समवेत रहायला आवडत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.१०.२०२१)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !