
‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे. कोणतीही कृती ‘धर्मशास्त्रप्रमाण’ असेल, तरच तिला हिंदु धर्माने मान्यता दिली आहे. याचे दैनंदिन जीवनातील सोपे उदाहरण म्हणजे ‘दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.’ हे कोणा व्यक्तीने सांगितलेले नाही; परंतु आजही बहुतेक सर्व हिंदू हा नियम पाळतात. धर्मशास्त्राने सांगितलेल्या अशा विविध कृतींतून मनुष्याचा मनोलय आणि बुद्धीलय होतो. त्यातूनच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होऊन तो जीवनमुक्त होतो.
सध्याचे बुद्धीप्रामाण्यवादी ‘संकुचित बुद्धी’लाच सर्वश्रेष्ठ समजत आहेत. त्यामुळे विविध बुद्धीअगम्य घटनांमध्ये त्याचे ‘का आणि कसे ?’, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यभर त्यातच अडकून जातात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)
‘साधकांना मायेत रममाण असणार्या व्यक्तीच्या सहवासात रहायला आवडत नाही, तसेच देवाला साधना न करणार्या व्यक्तीच्या समवेत रहायला आवडत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.१०.२०२१)
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !