सांगली, १२ ऑक्टोबर – गणेशनगर भागात ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी विद्युत् वाहिनीमधून अचानक आलेल्या विजेच्या उच्च दाबामुळे ६०० घरांमधील दूरचित्रवाहिनी संच, भ्रमणभाष, शीतकपाट यांसह अन्य विद्युत् उपकरणे जळली आहेत. ऐन नवरात्रीत वीजवितरण आस्थापनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठी आर्थिक हानी सोसावी लागली आहे. या प्रभागाचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वीज आस्थापनाच्या अधिकार्यांना बोलावून सदरची घटना निदर्शनास आणून दिली. मंगेश चव्हाण आणि परिसरातील नागरिकांनी ‘पंचनामा करून तात्काळ हानीभरपाई मिळावी’, अशी मागणी केली आहे. यानंतर वीजवितरण आस्थापनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सांगलीत विजेच्या उच्च दाबामुळे ६०० घरांमधील विद्युत् उपकरणे जळली !
सांगलीत विजेच्या उच्च दाबामुळे ६०० घरांमधील विद्युत् उपकरणे जळली !
नूतन लेख
- कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…
- पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
- सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !
- पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले