भारताच्या मागण्या अवास्तव असल्याची चीनची भूमिका
भारताच्या भूमीत घुसखोरी करायची आणि वर भारतालाच सुनवायचे, या चिनी उद्दामपणाला भारताने जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

नवी देहली – भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये लडाखमधील आपापले सैन्य माघार घेण्याविषयी १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये चीनने सैन्य माघार घेण्याचा प्रस्ताव नाकारला. चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने याविषयी चीन सैन्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताने अवास्तव मागण्यांवर जोर दिला होता.
PLA rejects Indian proposals to cool LAC tensions, no breakthrough in talks https://t.co/24tNDvi9oN
— Hindustan Times (@HindustanTimes) October 11, 2021
भारतीय सैन्याच्या निवेदनात म्हटले आहे की, बैठकीमध्ये भारताच्या उर्वरित क्षेत्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या; पण चीनने यावर सहमती दर्शवली नाही. तसेच चीन कोणताही दूरगामी प्रस्तावदेखील देऊ शकला नाही. त्यामुळे बैठकीत उर्वरित भागांवर योग्य चर्चा होऊ शकली नाही. दोन्ही बाजूंनी संवाद आणि भूमीवर स्थिरता राखण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, चीन द्विपक्षीय संबंधांचा एकंदर दृष्टीकोन विचारात घेईल आणि द्विपक्षीय करार अन् शिष्टाचार यांचे पूर्ण पालन करून उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्याच्या दिशेने काम करेल, अशी आमची अपेक्षा आहे. (चीनकडून अशी अपेक्षा करणे हास्यास्पदच होय ! – संपादक)
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !