आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…
‘मला मागील २ – ३ दिवसांपासून श्रीकृष्णाची पुष्कळ आठवण येत होती. ‘श्रीकृष्णासाठी काहीतरी काव्यात्मक लिहूया’, असे मला वाटत होते; पण प्रयत्न करूनही मला ते जमत नव्हते. श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून बोलल्यावर मला पुढील ओळी सुचल्या. त्या मी श्रीकृष्णाच्याच श्रीचरणी अर्पण करते.

श्रीकृष्णा, सतत तुझी आठवण येत आहे ।
तुझ्याशी पुष्कळ बोलावं, तुला सगळं
सगळं सांगावं, असं वाटत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। १ ।।
राधेसारखी प्रेममय भक्ती करावी,
असा विचार सतत येत आहे ।
स्वभावदोष आणि अहं यांमुळे,
खरंच रे मी अल्प पडत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। २ ।।
तुझ्या चरणांशी बसून तुझेच ध्यान करावे, असे वाटत आहे ।
हृदयाशी घट्ट धरून तुलाच अनुभवावे, असे वाटत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। ३ ।।
आता किती वेळा अजून हाका मारू ।
मला भेटायला, माझ्याशी बोलायला
तू धावून का येत नाहीस ।
कि असे करून ‘तळमळ वाढव’,
असे तू सांगत आहेस ।
कृष्णा, गोपाळा, नको ना अंत पाहू या जिवाचा ।
हा जीव तुझ्याशी एकरूप होण्यासाठीच व्याकुळ होत आहे ।
श्रीकृष्णा, काय करू रे,
तुझी पुष्कळ आठवण येत आहे ।। ४ ।।
– कु. श्रेया गुब्याड (वय २० वर्षे), सोलापूर (१३.१.२०२१)
| या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !