
भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये भारताचा राष्ध्वज असलेला तिरंगा फडकावणे म्हणजे एकेकाळी कारागृहात सडणे होते. तेथील धर्मांध नेते ते सामान्य धर्मांध ‘ज्याने स्वत:च्या आईचे दूध प्यायले असेल, त्याने काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवावा’, असे आव्हान देत असत. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांपूर्वी काश्मीर खोर्यात आणि विशेषतः श्रीनगरमध्ये वरील घोषणेची भित्तीपत्रके लावली जात असत. भारतियांचा सन्मान आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेला हा तिरंगा ध्वज तेथे फडकावणे हे केवळ स्वप्नच होते; परंतु ५ ऑगस्ट २०१९ हा सोन्याचा दिवस उगवला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी स्वत:च्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर भारतापासून काश्मीरला वेगळे करणारी ‘३७० अन् ३५ अ’ ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकली. समस्त भारतियांच्या अंतःकरणातील राष्ट्रभक्तीच्या मिणमिणत्या ज्योतीवरील काजळी काढली. त्यामुळे आज तीच राष्ट्रभक्तीची ज्योत २०२१ च्या स्वातंत्र्यदिनापूर्वीच श्रीनगरमधील लालचौकातील ‘घंटाघर’ नावाच्या वास्तूत तिरंग्याच्या रंगात झळकते आहे आणि संपूर्ण विश्वाला आसेतुहिमाचल ‘एक भारत, श्रेष्ठ भारत, विश्ववंद्य भारत अन् विश्वगुरु भारत’ हा संदेश मोठ्या अभिमानाने देत आहे.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !