संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असणार्या भारताचे सूतोवाच !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतांना भारत आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि आक्रमणासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रे यांना आळा घालण्यासाठी काम करेल, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी सांगितले. भारत या परिषदेचा ऑगस्ट मासासाठी अध्यक्ष झाला आहे, तर वर्ष २०२१-२२ या काळात अस्थायी सदस्यही आहे. सदस्य देशांना एकेक मासासाठी अध्यक्षपद मिळत असते.
Any instability in will directly affect India and New Delhi does not want action by the international community that would further destabilise Myanmar, India’s Permanent Representative to UN and President of UNSC for August Ambassador TS Tirumurti saidhttps://t.co/xQhbx7eLNO
— Economic Times (@EconomicTimes) August 3, 2021
संयुक्त राष्ट्रांतील कार्यक्रमांविषयी तिरुमूर्ती यांनी सांगितले की, सागरी सुरक्षा, आतंकवादाचा सामना आणि शांततारक्षण यांना प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधान मोदी हे ‘सागरी सुरक्षे’वर ९ ऑगस्टला होणार्या चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतील. परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर हे १८ ऑगस्टला ‘शांततारक्षण आणि तंत्रज्ञान’ यांवर आयोजित चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. १९ ऑगस्टला जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुट्रेस यांच्या इसिसवरील (इस्लामिक स्टेट म्हणजेच इस्लामचे राज्य) अहवालाविषयीच्या चर्चेतही सहभागी होणार आहेत.
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी