
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे निर्माण करण्यासाठी ज्या जागेची निवड करण्यात आली होती, त्या ठिकाणी ४.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत भूमीपूजन करावे’, असे मार्गदर्शन महर्षींनी केले होते. पूजनाच्या ठिकाणी आदल्या दिवशी रात्रीपासून ४.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत अल्प-अधिक प्रमाणात पाऊस चालू होता. विधीच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, यांचे आगमन होताच पाऊस थांबला आणि आकाश निरभ्र झाले. यातून ‘महर्षींनी दिलेल्या वेळेत विधी निर्विघ्न होण्यासाठी त्यांचा संकल्प झालेलाच असतो आणि तेच विधी निर्विघ्नपणे करवून घेतात’, याची अनुभूती आली.
या अनुभूतीविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, यांनी सांगितले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय स्थापन होणे’, हे ईश्वरी कार्य आहे. त्यासाठी पंचमहाभूतांची नेहमीच अनुकूलता रहाणार आहे. ‘ऊन आणि पाऊस पडणे’ हे पंचमहाभूतांच्याच अधिपत्याखाली असल्याने या विधीत पावसामुळे अडथळा येऊ शकला नाही.’’
– श्री. अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२१)
| या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !