पक्षांतर करणार्‍यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास सांगणे आवश्यक !

दिगंबर कामत

‘आपणास निवडून देणार्‍यांप्रती दायित्वाने वागणे आणि प्रामाणिक रहाणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आजच्या पालटत असलेल्या राजकीय वातावरणात पक्षांतराला कायमचा पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात पक्षांतरबंदी कायदा अधिक प्रभावशाली करण्यासाठी केंद्रशासनाकडे मागणी करण्याचा ठराव मी मांडणार आहे. राजकारणात सकारात्मक पालट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी पणजी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.’