
‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत. लिखाण आणि वाणी यांमधील शब्दांच्या माध्यमातून संस्था, संत आणि साधक यांविषयी नकारात्मकता पसरवली जात असल्याच्या घटना घडत आहेत. या सूक्ष्मातील लढ्यात वाईट शक्ती समाजातील विरोधक, तसेच नकारात्मक विचारांचा प्रभाव असलेले साधक यांना माध्यम करून त्यांचे लिखाण आणि वाणी यांतून अन्य साधकांमध्ये विकल्प निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. साधकाच्या श्रद्धेवर घाव घातला की, त्याच्या मनात विकल्प निर्माण होऊन त्याची साधनेत अधोगती होते.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवणार्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या षड्यंत्राला बळी न पडता जोमाने स्वतःची साधना वाढवा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.३.२०२६)
सनातन संस्था, सनातनचे संत आणि साधक यांच्याविषयी विकल्प पसरवणारे आक्षेपार्ह लिखाण किंवा बोलणे कुणी करत असल्यास त्याविषयी आपल्या क्षेत्राच्या उत्तरदायी धर्मप्रचारक संतांना कळवावे.
– विश्वस्त, सनातन संस्था.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !