देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर

उदय माहुरकर

स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर यांचे विचार काँग्रेसने आणि देशाने ऐकले असते, तर त्या वेळी देशाची फाळणी झाली नसती. आज देशाचे दुसरे विभाजन नको असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्रवादाचे विचार आत्मसात करून त्याचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. तसेच आपल्या देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरले पाहिजे.