वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘पू. आजींची त्वचा कापसाप्रमाणे मऊ झाली होती.
२. अनेक प्रसंगातून पू. आजींकडून इतरांचा विचार करणे, निरपेक्षता आदी गुण शिकायला मिळाले.

३. पू. आजींचा शबरीसारखा भाव असणे
पू. आजींकडे गेल्यावर मला त्यांच्या खोलीत पुष्कळ शांत वाटायचे. नामजपाला बसल्यावर त्यांच्याकडे पाहून श्रीरामाची आठवण यायची. त्या मला शबरी आणि श्रीराम यांची गोष्ट सांगायच्या. त्यांचा भाव शबरीसारखा होता. एकदा त्या जेवण करत असतांना ‘शबरी जशी प्रत्येक बोराची चव घेत होती, तसेच त्या प्रत्येक घासाची चव घेऊन श्रीरामाला भरवत आहेत’, असे मला वाटले. त्यांची देवाप्रती अपार भक्ती होती.
मला पू. आजींची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. नमिता पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२१)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !