
मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने घडणार्या घटनांमुळे सर्वसामान्य माणूस अचंबित होण्यापासून तो आता निराशेकडे चालला आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी ८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीला वाझे इतके प्रिय आहेत की, देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात त्यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर सभागृह ९ वेळा स्थगित करावे लागले. ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत जाऊन मी वाझे यांची भेट घेऊन अनिल परब यांचे नाव घ्यायला सांगितले’, हा आरोप हास्यास्पद आहे. राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या. राष्ट्रपती राजवट लागायला यापेक्षा अन्य वेगळे काय हवे असते ? हे तज्ञांनी मला सांगावे.’’
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !