तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय
भाग्यनगर (तेलंगाणा) – भारताने बंदी घातलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ५ आतंकवाद्यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा तेलंगणा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. वर्ष २०१३ मध्ये भाग्यनगरमधील दिलसुखनगर येथे झालेल्या २ बाँबस्फोटांत हे आतंकवादी सहभागी होते. या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १३१ जण घायाळ झाले होते.
🚨 Bhagyanagar (Hyderabad) 2013 blast case: Death sentence upheld for 5 convicted terrorists — including Yaseen Bhatkal, co-founder of the banned Indian Mujahideen (IM), along with Asadullah Akhtar, Rehman, Tahseen Akhtar & Ajaz.
18 killed, 100+ injured — yet justice comes 12… pic.twitter.com/wdpsxRtobX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 8, 2025
१३ डिसेंबर २०१६ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक महंमद अहमद सिद्दीबापा उपाख्य यासिन भटकळ, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उपाख्य वकास, असदुल्ला अख्तर उपाख्य हड्डी, तहसीन अख्तर उपाख्य मोनू आणि एजाज शेख यांना दोषी ठरवले होते.
संपादकीय भूमिका
|