|

नवी देहली – देहली न्यायालयाने बाटला हाऊस येथील चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा ठोठावली. ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’ असे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला. या चकमकीत देहली पोलीस दलातील पोलीस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर आरिज खान याने गोळीबार करत तेथून पलायन केले होते, असे न्यायालयाने म्हटले.
१३ सप्टेंबर २००८ या दिवशी ही चकमक झाली होती. त्यानंतर १० वर्षे आरिज खान पसार होता. त्याला फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.
काँग्रेसने चकमकीला ठरवले होते बनावट !
बाटला हाऊसमध्ये झालेल्या पोलीस आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीला काँग्रेसने बनावट ठरवले होते. यात ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या प्रती दुःख व्यक्त केले होते. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते की, मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची छायाचित्रे पाहून सोनिया गांधी यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. (काँग्रेसच्या अशा आतंकवादी प्रेमामुळेच पुढे जनतेने त्यांना केंद्र आणि देशातील अनेक राज्यांतून सत्ताच्युत केले. ‘सुंभ’ जळाला असला, तरी काँग्रेसचा आतंकवादीप्रेमाचा ‘पिळ’ अद्याप कायम असल्याने या फाशीवर ती मौन बाळगून आहे ! – संपादक)
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !