कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यावर गावकर्‍यांनी ७०० कोंबड्या पळवल्या !

  • ही आहे सध्याच्या नैतिकता घसरलेल्या भारतियांची स्थिती ! अशामुळे जगात भारताची प्रतिमा मलीन होत आहे, याविषयी ना जनतेला ना शासनकर्त्यांना आणि ना पोलिसांना खंत !
  • पूर्वीच्या काळात लोक धर्माचरणी असल्याने त्यांना कर्मफलन्यायाचा सिद्धांत ठाऊक असल्याने आणि त्यांची त्यावर श्रद्धा असल्याने त्यांच्या मनात चोरीचा विचारही येत नव्हता; मात्र सध्याच्या पुरोगामी, आधुनिक, निधर्मीवादी आणि विज्ञानवादी काळात लोकांची मानसिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, याचेच ही एक प्रातिनिधिक घटना म्हणावी लागेल !
गावकर्‍यांनी ७०० कोंबड्या पळवल्या ! (प्रतिकात्मक चित्र )

बारवाणी (मध्यप्रदेश) – येथील सेंधवा तालुक्यातील डोंडवा गावाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणार्‍या एका ट्रकला अपघात झाल्यावर तो पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील कोंबड्या रस्त्यावर आल्या. याचा अपलाभ घेत गावकर्‍यांनी या कोंबड्या गोळा करून ट्रकचालकाला देण्याऐवजी त्या घरी नेल्या. एकेका गावकर्‍याने २-३ कोंबड्या नेल्याचेही दिसून आले.

अनेकांनी अधिकाधिक कोंबड्या पकडून घेऊन जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्याही आणल्या होत्या. गाडीमध्ये एक सहस्राहून अधिक कोंबड्या होत्या; मात्र शेवटी यातील केवळ ३०० ते ३५० इतक्याच कोंबड्या उरल्या. ट्रकचालकाने सांगितले की, याविषयी पोलिसांना दूरभाष करून सांगितले; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या अपघातामुळे दीड ते २ लाख रुपयांची हानी झाली. (अशा निष्क्रीय पोलिसांवर मध्यप्रदेश सरकार कठोर कारवाई करणार का ? – संपादक)