|

बारवाणी (मध्यप्रदेश) – येथील सेंधवा तालुक्यातील डोंडवा गावाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणार्या एका ट्रकला अपघात झाल्यावर तो पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील कोंबड्या रस्त्यावर आल्या. याचा अपलाभ घेत गावकर्यांनी या कोंबड्या गोळा करून ट्रकचालकाला देण्याऐवजी त्या घरी नेल्या. एकेका गावकर्याने २-३ कोंबड्या नेल्याचेही दिसून आले.

अनेकांनी अधिकाधिक कोंबड्या पकडून घेऊन जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्याही आणल्या होत्या. गाडीमध्ये एक सहस्राहून अधिक कोंबड्या होत्या; मात्र शेवटी यातील केवळ ३०० ते ३५० इतक्याच कोंबड्या उरल्या. ट्रकचालकाने सांगितले की, याविषयी पोलिसांना दूरभाष करून सांगितले; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या अपघातामुळे दीड ते २ लाख रुपयांची हानी झाली. (अशा निष्क्रीय पोलिसांवर मध्यप्रदेश सरकार कठोर कारवाई करणार का ? – संपादक)
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !