
मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – नवीन संशोधनाचा दर्जा सिद्ध करण्यासाठी, तसेच संशोधनाला ‘आंतरराष्ट्रीय पेटंट’ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यय येतो. अनेकांना पैशांच्या अभावामुळे तसे करणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन संशोधन करणार्या होतकरूंना राज्यशासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी २२ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये प्रतिवर्षी २५० होतकरूंना आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !