
कोल्हापूर – कोरोना महामारीच्या काळात २०२ देशांनी महान भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे. कोरोनाच्या काळात आपण हस्तांदोलन करू शकत नाही. नमस्कार करणे, ही हिंदु धर्मात सांगितलेली पद्धती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य होती, हे सिद्ध झाले. अशा प्रकारे अनेक समस्यांवर आपण धर्माचरण करून मात करू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी ऑनलाईन शौर्य जागरण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानासाठी २६ जणांची उपस्थित होती. कु. प्रेरणा मठपती हिने सूत्रसंचालन केले.

व्याख्यानानंतर काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
१. सौ. माधुरी संतोष पलसकर – व्याख्यान ऐकून आत्मविश्वास वाढला. आपण देश, धर्म यांसाठी काय करायला हवे, ते नेमकेपणाने समजले.
२. श्रीराम कातवरे – नव्या पिढीने केवळ करियरच्या मागे न लागता, धर्मकार्यातही सहभागी होणे आवश्यक आहे.
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे झालेला अद्वितीय लाभ !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व