३० सहस्र रोहिंग्यांची मतदार सूचीमध्ये नोंद होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का ? – असदुद्दीन ओवैसी यांचे तेजस्वी सूर्या यांना प्रत्युत्तर

भाग्यनगर (तेलंगाणा) – जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

ओवैसी पुढे म्हणाले की, ३० ते ४० सहस्र रोहिंग्यांची नोंद मतदार सूचीमध्ये कशी झाली, याकडे लक्ष देण्याचे काम त्यांचे नाही का? भाजपचे दावे खरे असतील, तर त्यांनी २४ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अशा एक सहस्र नावांची तरी सूची द्यावी, असे आव्हानही ओवैसी यांनी भाजपला दिले आहे.