
सोलापूर – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून होणारी वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र सेना, मानद पशूकल्याण अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर्.टी.ओ.) सोलापूर यांना निवेदन दिले.
यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आदेश, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदे, महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाच्या २१ मे २०२६ च्या परिपत्रकानुसार अवैध गोतस्करी रोखण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्र शासन नियुक्त मानद पशूकल्याण अधिकारी केतनभाई शहा यांनी गोवंश संरक्षण हा सार्वजनिक सुव्यवस्था आणि समाजहिताशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सांगितले. हिंदु राष्ट्र सेना जिल्हाप्रमुख श्री. रवि अण्णा गोणे यांनी अवैध गोतस्करी करणार्यांवर कठोर गुन्हे नोंद करून संबंधित वाहनांचे परवाने रहित करण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे नगरसेवक सतीश अण्णा सिरसिल्ला, भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विजय महिंद्रकर, ‘जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थे’चे अध्यक्ष विजय यादव आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court