देशभरात ‘धर्मांतरबंदी कायदा’ त्वरित लागू करा !

आज देशभरात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लवकरात लवकर लागू करायला हवा. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अभियानाला आरंभ करायला हवा. ख्रिस्ती मिशनर्‍यांना ‘टुरिस्ट (प्रवासी) व्हिसा’ देऊ नये. धर्मांतर करणार्‍यांना पैसे कुठून येतात ? याची चौकशी करायला हवी. सेवेच्या नावाखाली ग्रामीण भागात जाणार्‍या ख्रिस्त्यांना ग्रामीण भागात जाण्याची अनुमती देऊ नये, तसेच पत्रके वाटणार्‍या ख्रिस्त्यांना त्यांनी ती पत्रके सरकारला दाखवणे बंधनकारक करावे. रुग्णालयात ‘नन्स’ना नोकरी देऊ नये; कारण तेथे त्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. प्रार्थना आणि आशीर्वाद सभा यांच्या माध्यमातून चालू असलेल्या धर्मांतराच्या विरोधात समाजाने आवाज उठवायला हवा.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.