
कोलकाता (बंगाल) – राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांनी म्हटले, ‘बंगालमध्ये रामराज्याची काही आवश्यकता नाही. त्याने लोकांचे पोट भरत नाही. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले ‘रामराज्या’चे सूत्र राज्याच्या वास्तविक गरजांशी संबंधित नसल्याचेही त्यांनी नमूद केले. रामनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले गिरी यांनी राज्यात सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या तैनातीवरही आक्षेप घेतला. त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत ‘भाजप लाभासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे’, असे म्हटले आहे.
Outrageous remark by a veteran TMC leader Akhil Giri: “Ram Rajya does not fill stomachs” & is “not relevant” to Bengal’s needs.
The whole world knows that “Ram Rajya” stands for justice, dharma & good governance.
Such statements raise serious questions on priorities. In… pic.twitter.com/6rwySpDrRW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 10, 2026
गिरी यांनी पुढे म्हटले की,
१. राज्यातील जनतेला विकास आणि कल्याण हवे आहे, धार्मिक घोषणांवर आधारित राजकारण नव्हे. त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि बंगालमध्ये ‘ममताराज’ कायम राहील.
२. भाजप बंगालमध्ये आवश्यक नसलेली सूत्रे प्रचारात उपस्थित करत आहे. राज्यातील मुसलमान समाज पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्यासमवेत आहे.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’