पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

‘अन्य दिवसांच्या तुलनेत अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना पुष्कळ अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतो. या दोन्ही तिथींच्या दिवशी साधना करणार्‍या व्यक्तींना देवता साहाय्य करतात का ?’, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर शोधण्यासाठी गणपति या देवतेविषयीचे संशोधन आपण २ एप्रिल या दिवशी पाहिले. आज दत्त आणि श्रीराम या देवतांविषयी पाहूया. 

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025115.html

पौर्णिमा आणि अमावास्या

१. अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१ अ २. दत्त

१ अ २ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी दत्तातील निर्गुण तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. त्याला अनुसरून पौर्णिमेच्या दिवशी दत्तातील भाव आणि आनंद ही दोन्ही स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली. तसेच दत्तातील मारक तत्त्वही ५ टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी गणपतीप्रमाणे दत्तातीलही निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, हे लक्षात आले.

१ अ २ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी दत्तातील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ते पौर्णिमेपेक्षा अधिक वाढले. अमावास्येच्या दिवशी दत्तातील भाव आणि आनंद यांची स्पंदने आणखी वाढली. तसेच दत्तातील मारक तत्त्वही पौर्णिमेपेक्षा अधिक वाढले. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी अधिक प्रमाणात असलेल्या अनिष्ट शक्तींच्या प्रभावाशी लढण्यासाठी दत्तातील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व अधिक प्रमाणात वाढते’, हे लक्षात येते.

१ अ ३. श्रीराम

१ अ ३ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी श्रीरामाच्या चित्रातील सगुण आणि निर्गुण तत्त्व अन्य दिवशी होते, तेवढेच राहिले; मात्र श्रीरामातील आध्यात्मिक भावाची स्पंदने १० टक्क्यांनी वाढली. तसेच पौर्णिमेच्या दिवशी श्रीरामातील तारक आणि मारक तत्त्व अन्य दिवशी होते, तेवढेच राहिले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी प्रभु श्रीराम आपल्यातील आध्यात्मिक भावाची स्पंदने वाढवून आपल्याला अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म स्तरावर लढायला साहाय्य करतो’, हे लक्षात आले.

१ अ ३ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी श्रीरामाच्या चित्रातील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. तेव्हा श्रीरामातील भाव आणि आनंद यांची स्पंदने वाढली. तसेच अमावास्येच्या दिवशी श्रीरामातील तारक तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. यावरून लक्षात येते, ‘अमावास्येच्या दिवशी अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी श्रीरामातील निर्गुण तत्त्व आणि तारक तत्त्व वाढते.’

(क्रमश:)

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.३.२०२६)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025863.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक