बागलकोटे (कर्नाटक) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक केल्याचे प्रकरण

बागलकोटे (कर्नाटक) – १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर शहरातील मशिदीतून दगडफेक करण्यात आली. या घटनेचा कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र निषेध केला आहे. राज्यातील जनतेने शांतता आणि सलोखा राखावा, असे आवाहन त्यांनी ‘एक्स’वरून केले आहे. ‘या घटनेचे निःपक्षपाती अन्वेषण करून या दुष्कृत्यात सामील असलेल्या समाजकंटकांना कायद्यानुसार चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मी पोलीस अधिकार्यांना दिली आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Bagalkot Stone Pelting Row: CM @siddaramaiah assures “strict action” against anti-social elements.
With Congress in power, an administration some describe as the modern-day "descendants of the Mughals"; can Hindus truly expect justice?
Stone pelting on Shiv Jayanti procession… https://t.co/ZPPUsz4FIS pic.twitter.com/CSBMWucV3L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2026
शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या या दगडफेकीच्या घटनेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (हिंदूंनी संघटन शक्ती दाखवल्यास धर्मांधांना अशाप्रकारे आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे हिंदूसंघटन हीच काळाची खरी गरज ठरली आहे ! – संपादक) या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती बागलकोटे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी दिली आहे.
शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक हे देशद्रोही कृत्य ! – प्रमोद मुतालिक

बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर बागलकोटेमधील किल्ला ओणी भागात मशिदीतून झालेल्या दगडफेकीवर श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक करणे, हे देशद्रोही कृत्य आहे’, असे मुतालिक यांनी म्हटले आहे. या घटनेत पोलीस अधिकारी घायाळ झाले होते. मिरवणुकीवर दगडफेक करणार्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मुतालिक यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकामुख्यमंत्री जरी म्हणत असले, तरी कर्नाटकात काँग्रेसचे, म्हणजे मोगलांच्या वंशजांचे राज्य असल्याने तेथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच आहे ! संतप्त हिंदूंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री अशी फुकाची आश्वासने देत आहेत ! |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर