Vasheni Raigad Shivling Vandalised : महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी वशेणी (जिल्हा रायगड) येथील शिवपिंडीची तोडफोड !  

  • धर्मांधांकडून तोडफोड झाल्याचा गावकर्‍यांना संशय

  • पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

तोडलेली शिवपिंड

वशेणी (उरण) – येथील समुद्रकिनारी वाळू बंदराजवळील श्राद्धविधीसाठी स्थापण्यात आलेली शिवपिंडीची ११ फेब्रुवारीच्या रात्री तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड धर्मांधांनी केल्याचा संशय गावकर्‍यांना आहे. ‘गावातील कुणी व्यक्ती असे करू शकत नाही’, असे गावकर्‍यांचे ठाम मत आहे. काही दिवसांपूर्वी याच पिंडीवर मानवी विष्ठा फासून तिची विटंबना केल्याचे दृष्टीस पडले होते. गावातील एका हिंदुत्वनिष्ठ मुलाने त्या वेळी ही पिंड स्वच्छ केली होती.

या घटनेनंतर ३ दिवसांनी महाशिवरात्र असल्याने २ पोलीस येथे सुरक्षेसाठी आले होते. ‘ही तोडफोड कुणी केली ?’ याचा शोध घेऊन त्याला शिक्षा करण्याऐवजी ही घटना लपवून ठेवण्याकडे पोलिसांचा कल असल्याचे त्यांच्या बोलण्यातून गावकर्‍यांच्या लक्षात आल्याने गावकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस गावातील मनोरुग्ण बाईने हे कृत्य केल्याचे मनानेच सांगून आरोपींना एकप्रकारे पाठीशीच घालत आहेत. प्रत्यक्षात ही मनोरुग्ण बाई गावातील एका मंदिरात रहात असून ती तेथील स्वच्छता करते आणि देवाला फुलेही वाहते. त्यामुळे ‘ती असे कृत्य करू शकत नाही’, असे गावकर्‍यांनी सांगितले.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

पोलिसांकडे चौकशी केली असता सारवासारव आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न !

पोलिसांकडे ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने चौकशी केली असता, ते म्हणाले, ‘‘गावात कुणी वेडी बाई आहे, तिने हे कृत्य केले असावे. यात बातमी देण्यासारखे एवढे काही नाही.’’ (उद्या हिंदूंवर आक्रमण झाले, तरी पोलीस असेच म्हणतील, हे या प्रसंगातून हिंदूंनी ध्यानात घ्यावे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – संपादक)

गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश पाटील यांनी ती शिवपिंडी आणि चौथरा बांधला आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ माध्यमांच्या वार्ताहराने या प्रसंगाची माहिती मिळवण्यासाठी श्री. अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांच्या पत्नी सौ. पाटील म्हणाल्या, ‘‘पोलिसांनी ‘या गोष्टीचा जास्त प्रचार करू नका’, असे त्यांना सांगितले. त्यामुळे गावतील लोकांना पोलिसांचा पुष्कळ राग आला.’’

संपादकीय भूमिका

  • छत्रपती शिवरायांच्या राजधानीत अजूनही धर्मांधांचा उच्छाद ३०० वर्षांनंतरही चालू आहे, याचेच हे उदाहरण आहे !
  • आरोपीला पकडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी हिंदूंची दिशाभूल करणार्‍या पोलिसांनी हिंदूंचा विश्वास कधीच गमावला आहे. त्यामुळे येथून पुढे श्रद्धास्थानाच्या रक्षणासाठी हिंदूंनाच संघटित होण्याविना पर्याय नाही !
  • अन्य पंथियांच्या संदर्भात छोटीशी जरी अयोग्य गोष्ट घडली, तरी ते काय करतात, हे हिंदूंना ठाऊक आहे. हिंदू सहिष्णु असल्यामुळेच धर्मांध असे साहस करू धजावतात !