मराठी पत्रकारितेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य ! – मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वत:च्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. स्वत:च्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला.

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा विधानभवनाच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे.

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर एस्.टी. कर्मचारी संघटना आणि शासन यांनी समन्वयातून मार्ग काढावा ! – ग्राहक पंचायतीची मागणी

सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी.च्या  कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन चालू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेची असुविधा होत आहे.

मराठी भाषेचा विकास, हाच आपल्या सर्वांचा ध्यास आहे !

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, तसेच शिक्षणातही मराठी  भाषेला अग्रस्थान मिळावे, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी भाषेचा विकास, हाच आपल्या सर्वांचा ध्यास आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती एक संस्कृती आहे.

ओमिक्रॉन व्हायरसविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण आफ्रिकेत या ओमिक्रॉन व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त ऐकायला मिळत आहे. यामुळे राज्यशासनाने तातडीने याविषयी उपाययोजना राबल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला ! – किरीट सोमय्या

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमुळेच हा मुसलमानांचा अत्याचार होत आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला आहे, अशी टीका माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.

२६/११ चे मुंबईवरील आक्रमण हे आतंकवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारे होते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘पोलीस आणि एनएसजी कमांडो यांनी गोळ्या झेलून अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. शौर्य, धैर्य आणि समर्पण यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा अन् कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चंद्रपूर येथे वाघाच्या आक्रमणात महिला वनरक्षकाचा मृत्यू !

गस्तीवर असतांना वाघाने अचानक केलेल्या आक्रमणात कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक महिला ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे.

कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचे उदाहरण ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले