देवाचे भक्त होण्याचे महत्त्व !

‘आपण देवाचे भक्त बनलो की, देव आपत्काळातही आपल्या तोंडात सोन्याचा चमचा ठेवतो, म्हणजेच तो आपल्याला आपत्काळाची झळ लागू देत नाही !’
– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’विषयी योग्य दृष्टीकोन !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल.

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले