मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी १९ शुद्धीकरण प्रकल्प बसवणार !

सध्या मुंबई शहर देहलीपेक्षाही सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखले जात आहे. यावर प्रतिबंध म्हणून येथे १९ ‘प्युरिफिकेशन युनिट’ (शुद्धीकरण प्रकल्प) बसवले जाणार आहेत. त्यासमवेत धुक्याचे १४ मनोरेही (स्मॉग टॉवर्स) उभारण्यात येणार आहेत.

पालघर येथील साधू हत्याकांडाची होणारी पुनरावृत्ती टळली !

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनई चंद्रनगर येथे २ साधू मुले पळवायला आले आहेत, अशी अफवा पसरली. ही अफवा पसरल्यानंतर नाथजोगी समाजाच्या २ साधूंवर आक्रमण होण्याच्या आधीच गावातील एका पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे त्यांनी साधूंना सुरक्षित ठिकाणी हलवले.

हिंदु युवतीचा मुसलमान कुटुंबियांकडून झालेल्या छळाविषयी योग्य कारवाई करा !  

देशभरात हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’द्वारे होत असलेले शोषण थांबावे आणि हिंदु युवती अन् पालक यांना याची दाहकता समजावी, यासाठी सकल हिंदु समाज अशा विषयांची नोंद घेत आहे.

मंदिराला वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज जलील मंदिरात आले !

श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात झालेला वाद हा २ गटांतील लोकांमुळे झाला होता. त्यामुळे याला हिंदु-मुसलमान वाद म्हणता येणार नाही, असे शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.

सरकार जनतेविषयी असंवेदनशील ! – म्हादई रक्षा समिती

गोवा सरकारने विर्डी धरण प्रकल्पावर देखरेख न ठेवल्याने आज गोव्यावर ही स्थिती ओढवली आहे.

गोवा : १० वी इयत्तेच्या परीक्षेतील कोकणी प्रश्नपत्रिकेमध्ये चूक झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्ग गोंधळात !

प्रश्नपत्रिकेमधील चुका आणि चुकीच्या पद्धतीने प्रश्न मांडल्याने विद्यार्थ्यांना ५ ते १० गुणांना मुकावे लागणार असल्याची भीती विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

गोवा : मडगाव रेल्वे परिसरात मध्यरात्री दारूच्या नशेत ३ गुंडांकडून महिलेवर प्राणघातक आक्रमण

या भागात ‘मथुरा’ नावाचे मद्यालय हे अवैध आहे. या मद्यालयाकडे अबकारी खात्याची अनुज्ञप्ती नाही. हे मद्यालय प्रतिदिन उत्तररात्री २-३ वाजेपर्यंत बिनदिक्कत चालू असते. याच मद्यालयाजवळ हे आक्रमण झाले आहे.

गोवा सरकारकडून १५९ माजी खाण लीजधारकांना नोटीस

सरकारने लीजधारकांना आणखी एक मासाचा अवधी दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार राज्यातील सर्व खाणींवर राज्य सरकारचे नियंत्रण असेल आणि सर्व खाणी राज्य सरकार चालवणार आहे.

महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम बंद

महाराष्ट्र सरकारने अचानक कुणालाही कल्पना न देता आणि कुणाचीही अनुज्ञप्ती न घेता विर्डी धरणाचे अनधिकृत बांधकाम चालू केले. आता काम बंद असले, तरी ते पुन्हा कधीही चालू होऊ शकते. सरकारने संबंधित ठिकाणी कायम पाळत ठेवली पाहिजे.

५ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मी सावरकर’ कार्यक्रम !

‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करतील, तर संगीत संयोजनाचे दायित्व प्रशांत लळीत यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘मेरक इव्हेंट्स’ने केले आहे.