किमान कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवून पतसंस्थाचे कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन

सहकारी पतसंस्थांमध्ये जनतेचा पैसा गुंतलेला असतो, सबब ग्राहकांची पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पतसंस्था चालू रहाणे आवश्यक ठरते, किमान कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आज सहकार आयुक्त यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.

मशिदीत न जाता घरातच नमाज पठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ?  दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्‍यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !

विविध घटकांसाठी १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ घोषित

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.

देशभरात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुलीला स्थगिती

देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्‍या वाहतुकीलाच अनुमती आहे.

अमेरिकेत लुटालूट होण्याच्या भीतीने लोकांची शस्त्रखरेदीसाठी गर्दी !

कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !

भारतात १५ मेपर्यंत १३ लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता

लोकहो, हा वेग रोखणे आपल्या सर्वांच्या हातात आहे, हे लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रयत्न करूया !

देशात कोरोनाच्या मृतांची संख्या वाढणार नाही ! – डॉ. नरिंदर मेहरा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद

रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही; पण हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. देशात अल्प प्रमाणात मृत्यू होण्याची ३ कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार शक्ती आणि…

लक्षणे न दिसताही कोरोना पसरण्याची शक्यता ! – तज्ञांची माहिती

कोरोना विषाणूची सर्वसामान्यपणे प्रारंभी दिसणारी लक्षणे कळताच तो झाल्याचे कळते. असे असले, तरी एखाद्या व्यक्तीमध्ये या विषाणूची लक्षणे दिसत नसली, तरीदेखील ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असू शकते

साम्यवाद्यांच्या केरळमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीत मद्याचा समावेश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे असतांना केरळ राज्यात मद्यविक्री चालू रहाणार आहे; कारण केरळमध्ये मद्यासह सर्व प्रकारचे पेय पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत अंतर्भूत…

१४ एप्रिलपर्यंत मुंबईतील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस बंद रहाणार ! – रेल्वे प्रशासन

मुंबई शहर आणि उपनगर यांमधील मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावर एकही रेल्वे धावणार नसून या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस १४ एप्रिलपर्यंत बंद रहाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे.