बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक

भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.

सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले.

सौंदत्तीचे रेणुका मंदिर ११ मासांनंतर भाविकांसाठी खुले

सौंदत्ती डोंगरावर प्रतिवर्षीप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवसापासून ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार होती; परंतु ३१ जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे यात्रा रहित करण्यात आली होती. 

कर्नाटक विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार पहात होते पॉर्न व्हिडीओ !

विधान परिषदेत पॉर्न पहाणारे प्रत्यक्ष जीवनात काय करत असतील, याचा विचार जनतेच्या मनात येत असणार ! काँग्रेसमध्ये नैतिकता नावाची गोष्ट असेल, तर अशा आमदारांवर कारवाई होईल अन्यथा सर्वच एकाच माळेचे मणी !

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

(म्हणे) ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा !’ – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

मुंबईचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा काहीही संबंध नसतांना वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करत आहेत, हेच स्पष्ट होते ! जर सीमावादातील भाग वादग्रस्त आहे, तर तो केंद्रशासित करण्यास काय अडचण आहे ?

चित्रपट, नाटके, ओटीटी प्लॅटफॉर्म, तसेच विविध माध्यमे यांद्वारे हिंदूंच्या देवता, तसेच हिंदुत्वावर होणार्‍या आघातांना आळा घाला ! – हमारा देश संघटना

सातत्याने हिंदुत्व, हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना केली जाते. या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

(म्हणे) ‘महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवला, तर रक्तपात होईल !’ – नागराज वाटाळ, कन्नड संघटना

देशात आपण कायद्याचे राज्य आहे, असे एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे नागराज वाटाळ यांच्यासारखे थेट कायदा हातात घेण्याची भाषा करतात ! समाजात फूट पाडणारी अशाप्रकारे वक्तव्ये करणार्‍यांवर प्रशासनाने योग्य वेळी कारवाई करणे आवश्यक आहे !

गोकाक (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोकाक येथे तहसीलदार प्रकाश होल्लेप्पगोल आणि गटशिक्षण अधिकारी राठोड यांना निवेदन देण्यात आले.

हुन्नुरगी (कर्नाटक) गावातील बाळू बरगाले यांनी त्यांच्या नातवाचे नामकरण स्मशानभूमीत केले !

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘स्मशानभूमीतील बारशाचा उपक्रम हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकांनी श्रद्धेचे बाजारीकरण केल्यामुळे अंधश्रद्धा वाढली आहे.’’