व्यायाम हे ‘उरकण्याचे काम’ नसून ते ‘आवडीने करण्याचे नित्यकर्म’ व्हायला हवे !
‘व्यायाम करत असतांना स्वतःच्या शरिराची कार्यक्षमता आधीच्या तुलनेत वाढत आहे ना’, याकडे ठराविक कालावधीने लक्ष द्यायला हवे.
‘व्यायाम करत असतांना स्वतःच्या शरिराची कार्यक्षमता आधीच्या तुलनेत वाढत आहे ना’, याकडे ठराविक कालावधीने लक्ष द्यायला हवे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते.
रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी अल्पाहार करणे, हे अन्नविष निर्मितीचे पुष्कळ मोठे कारण आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी सर्व आयुर्वेद महर्षींनी विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना दुसरे अन्न ग्रहण करू नका’, असे वारंवार सांगितले आहे.
सकाळी अल्पाहाराच्या वेळेस रात्रीचे जेवण पचलेले नसते; पण नेहमीच्या सवयीमुळे भूक लागते आणि आपण अल्पाहार करतो.
‘आयुर्वेदामध्ये एवढे सारे लिहिण्यासारखे असतांना तुम्ही केवळ ‘सकाळी अल्पाहार करू नका आणि त्या वेळेत व्यायाम करा’, असे का लिहिता ?’, याचे उत्तर . . .
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे !
पाण्याच्या टाकीच्या तळाशी भोक पडलेले असतांना तिच्यामध्ये पाणी भरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी टाकी भरणार नाही. त्याप्रमाणे विकारांची वर सांगितलेली कारणे चालू असतांना कितीही औषधे घेतली, तरी कोणताही विकार बरा होणार नाही. आरोग्य हवे असेल, तर वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळायला हव्यात.’
‘जर तुम्ही नेहमी सकाळी ८ वाजता अल्पाहार करत असाल, तर पुढचे २-३ दिवस तो ८.३० वाजता करावा. असे प्रत्येक २-३ दिवसांनी अल्पाहाराची वेळ ३०-३० मिनिटे पुढे ढकलत रहावे. ही वेळ जेव्हा सकाळी ११ च्या जवळ येईल, तेव्हा थेट जेवून घ्यावे. अल्पाहार करणे शरिराच्या दृष्टीने आवश्यक नसते.