आसाममध्ये मुसलमान ५० टक्के झाल्यास राज्याला बांगलादेशात विलीन करण्याचा प्रयत्न होईल ! – Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली भीती !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – येथे झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, आसाममध्ये बांगलादेशातून आलेल्या मुसलमानांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही परिस्थिती राज्याच्या अस्तित्वाला धोका ठरू शकते.

जर ही लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली, तर आसामला बांगलादेशात विलीन करण्याच्या हालचाली चालू होऊ शकतात. सध्या मुसलमानांची लोकसंख्या सुमारे ४० टक्क्यांपर्यंत पोचली आहे.

काँग्रेसवर टीका करतांना सरमा म्हणाले की,

अनेक दशकांच्या लांगूलचालनामुळे राज्यात एक नवी लोकसंख्या रचना निर्माण झाली असून ती आता सुमारे दीड कोटींपर्यंत वाढली आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात ३४ टक्के मुसलमान होते, त्यांपैकी ३१ टक्के मुसलमान मूळ बांगलादेशी असल्याचे नोंदवले गेले. वर्ष २०२७ पर्यंत या लोकसंख्येत वाढ होईल.

संपादकीय भूमिका

केवळ आसामचे नव्हे, तर भारतातील प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशातही इतकी लोकसंख्या झाली, तर संपूर्ण भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हिंदू निष्क्रीय राहिले, तर ते कठीण रहाणार नाही !