समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक ! – सौ. रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्षा

मूल (जिल्हा चंद्रपूर) – समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या भरकटत चाललेल्या पिढीला धर्माचरण आणि धर्मपालन यांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर वारंवार आघात होत आहेत. त्यामुळे स्वसंरक्षण आणि धर्मरक्षण यांमुळेच आपले रक्षण होणार आहे, असे मार्गदर्शन येथील माजी नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर सनातन संस्थेचे श्री. दीपक जमनारे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्वश्री भाजपचे मूल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, भाजपचे कार्यकर्ते युवराज चावरे, पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.