काश्मीरप्रश्नी कुणीही मध्यस्थी करू नये !

  • भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुनावले !

  • पाकव्याप्त काश्मीर रिकामे करा ! – पाकला दिली चेतावणी 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली – जम्मू-काश्मीरशी संबंधित कोणतेही सूत्र केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जाईल. त्यात कोणत्याही तिसर्‍या पक्षाची भूमिका रहाणार नाही. हे भारताचे बर्‍याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही पालट झालेला नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी या सूत्रावर मध्यस्थी करण्याचे विधान केले होते, त्यावर भारताने भारताची भूमिका स्पष्ट केली, तसेच ‘पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर रिकामे करावे लागेल’, असेही भारताने पाकला बजावले.

संपादकीय भूमिका 

भारताने काश्मीरप्रश्नी कोणताच हस्तक्षेप न स्वीकारता पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा !