बलुच नेत्याने पाकिस्तानला करून दिली जाणीव !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा, अशी जाणीव बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानला करून दिली. पाकिस्तान बलुचिस्तानमधील नागरिकांचे बलपूर्वक अपहरण आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन करत असल्याच्या विरोधात मेंगल येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
मेंगल पुढे म्हणाले, ‘‘आम्ही तुमची (पाकिस्तानची) हुशारी १९७१ मध्येच पाहिली आहे, जेव्हा तुम्ही गुडघे टेकले आणि ढाक्यामध्ये शस्त्रे खाली ठेवली. वर्ष १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने ढाक्यामध्ये भारतासमोर शरणागती पत्करली आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. ९० सहस्र पाकिस्तानी सैनिकांनी ढाक्यामध्ये कशा प्रकारे अपमानजनक स्थितीत शरणागती पत्करली ?, हे सर्वांना ठाऊक आहे. पाकिस्तानने हे त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिकवले पाहिजे. त्यांनी मुलांना सांगितले पाहिजे की, ढाक्यामध्ये आपल्या सैनिकांची केवळ शस्त्रेच मागे राहिली नाहीत, तर त्यांच्या विजारीही (पँटही) तेथेच लटकत होत्या.’’
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif