काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे खोचक विधान !

मुंबई – सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव निवडले असले, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. मतपेढीला खुश करण्यासाठी विधवांच्या भावनांचा आधार घेतला जात आहे, असे विधान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, ‘‘सध्या यावर भाष्य करणे योग्य नाही. सध्याच्या स्थितीत सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’’
🇮🇳 "Operation Sindoor won’t have any real effect!" – Congress’ Prithviraj Chavan mocks India’s military strike! 😡
📣 BJP hits back
👉 Congress did nothing but appease terrorists when in power — now they question an op that united the nation?
🇮🇳 While every Indian swells with… pic.twitter.com/wNBz3ohKhp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2025
भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका !
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन ए. सिन्हा म्हणाले, ‘‘पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान लज्जास्पद आहे. वर्षानुवर्षे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने केलेल्या आक्रमणानंतर कोणताही आतंकवादी पुन्हा तसे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, असा ‘ऑपरेशन सिंदूर’चा अर्थ आहे. असे काही करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील.’’ भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, ‘‘अशा संवेदनशील गोष्टींना स्वस्त राजकारणाशी जोडण्याची काँग्रेसच्या नेत्यांची जुनीच सवय आहे.’’
Mumbai, Maharashtra: BJP National spokesperson Tuhin A. Sinha on Congress leader & former Maharashtra CM Prithviraj Chavan's statement regarding #OperationSindoor says, "…He said that the name 'Operation Sindoor' was given to gain emotional advantage. But I believe that’s a… pic.twitter.com/MVAwN4KxQx
— IANS (@ians_india) May 8, 2025
संपादकीय भूमिका
|