Prithviraj Chavan Criticized Operation Sindoor : (म्हणे) ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही ! – काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे खोचक विधान !

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव निवडले असले, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. मतपेढीला खुश करण्यासाठी विधवांच्या भावनांचा आधार घेतला जात आहे, असे विधान काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, ‘‘सध्या यावर भाष्य करणे योग्य नाही. सध्याच्या स्थितीत सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’’

भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका !

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन ए. सिन्हा म्हणाले, ‘‘पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान लज्जास्पद आहे. वर्षानुवर्षे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत भारताने केलेल्या आक्रमणानंतर कोणताही आतंकवादी पुन्हा तसे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, असा ‘ऑपरेशन सिंदूर’चा अर्थ आहे. असे काही करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील.’’ भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, ‘‘अशा संवेदनशील गोष्टींना स्वस्त राजकारणाशी जोडण्याची काँग्रेसच्या नेत्यांची जुनीच सवय आहे.’’

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात आतंकवादाच्या विरोधात काहीही न करता केवळ आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचाच प्रयत्न केला, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना काँग्रेसच्या नेत्यांना आतंकवादाच्या विरोधातील कारवाईविषयी बोलण्याचा अधिकारच काय ?
  • ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सर्व भारतियांना अभिमानास्पद वाटत असतांना पृथ्वीराज चव्हाण यांनाच ते खुपते, यातूनच त्यांच्यात राष्ट्राभिमान किती असेल, हे लक्षात येते !
  • ‘ऑपरेशन सिंदूर’कडे केवळ नावाच्या दृष्टीकोनातून न बघता त्या कारवाईने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय साध्य केले आहे, हे पहायला शिकावे ! अर्थात् काँग्रेस तसे करणारच नाही, हेही खरे !