(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’

पर्यावरणवाद्यांच्या अधिवक्त्यांची मुंबई उच्च न्यायालयात मागणी

संग्रहित छायाचित्र

मुंबई – पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या) मूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीत शाडूच्या मातीचा वापर सांगितला आहे आणि पर्यावरणपूरक रंग देण्यास सांगितले आहे; परंतु या नियमांची पूर्तता होत नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भूमिका पालटल्याने प्रदूषणात भर पडणार आहे. केंद्राने १ ऑगस्ट २०२५ निर्णय नवीन निर्णय रहित करावा. पोओपीपासून मूर्ती निर्माण केल्या नाहीत, तर कुणी विकतच घेणार नाहीत. त्यामुळे पीओपी बंदीची काटेकार कार्यवाही करावी, अशी मागणी ठाणे येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांचे अधिवक्ता मिहीर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात संबंधित खटल्याच्या प्रकरणी केली.

पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेनेही या संदर्भात याचिका प्रविष्ट केली असून त्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याचे म्हटले आहे. वरील दोन्ही याचिकांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात १५ जुलैला झाली.

संपादकीय भूमिका

  • पीओपीच्या श्रीगणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याची ओरड करणारे नद्यांमध्ये सोडले जाणारे प्रक्रियाविरहित सांडपाणी, तसेच औद्योगिक प्रदूषण यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • वास्तविक हिंदु धर्मशास्त्रानुसार चिकणमातीची मूर्ती बनवणे आवश्यक आहे. असे असले, तरी प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्याचे वैज्ञानिक चाचण्यांअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी ही मागणी करून काय साध्य करू पहात आहेत ?