कलबुर्गी (कर्नाटक) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २८ निष्पाप हिंदूंचा बळी घेणार्या आतंकवादी आक्रमणाचा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात रस्त्यावर पाकिस्तानचा ध्वज चिकटवून रोष व्यक्त केला. दुसरीकडे शहरातील नॅशनल चौकात रस्त्यावर लावलेले पाकिस्तानचे ध्वज बुरखाधारी मुसलमान महिलांनी काढून टाकले. ‘पाकिस्तानच्या ध्वजाविषयी मुसलमान महिलांना इतकी काळजी का ?’, असा प्रश्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
Burqa-clad women in Kalaburagi, Karnataka, removed the Pakistani flags displayed to protest the #PahalgamTerroristAttack
Urgent need to identify and address individuals exhibiting such anti-national sentiment to prevent potential threats to India.
VC: @News18Kannada pic.twitter.com/twPbZ58sB6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 26, 2025
पोलिसांनी आरोपींना सोडले !
या प्रकरणी ब्रह्मपूर पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेऊन चौकशी केली आणि नंतर सोडून दिल्याचे वृत्त आहे. (कर्नाटकात पाकिस्तानी राजवट म्हणून ओळल्या जाणार्या काँग्रेसचे राज्य असल्याने याहून वेगळे काय होणार ? काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या कर्नाटकातील हिंदूंनी या विरोधात आंदोलन करून सरकारला जाब विचारला पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|