एकांतात असतांना अन्य कल्पना करण्यापेक्षा भगवंताची कल्पना करावी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मनुष्य अगदी एकटा किंवा एकांतात असला, तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्याभोवती गोळा करतो. विशेषत: विद्वान लोकांना कल्पना अधिक असतात. तेव्हा कल्पना करायचीच, तर ती भगवंताविषयी करूया. ‘भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे’, अशी कल्पना आपण करूया. त्यातच खरे हित आहे. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. मन एकाग्र होवो न होवो; पण नामस्मरण सोडू नये.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज