Pakistan Based Terriorist Call : भारतातील रेल्वे रूळांना लक्ष्य करा ! – फरहातुल्ला घोरी

  • पाकिस्तानी आतंकवादी फरहातुल्ला घोरी याचे भारतातील जिहाद्यांना चिथावणी

  • हिंदूंचे नेते, पोलीस, तसेच इंधन अन् जल वाहिन्या यांनाही लक्ष्य करण्याची चिथावणी

पाकिस्तानी आतंकवादी फरहातुल्ला घोरी

नवी देहली – देशात गेल्या काही मासांमध्ये रेल्वेगाड्या रूळावरून घसरल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांत रेल्वे रूळांवर दगड आणि लोखंडी साहित्य ठेवण्यात आल्याच्या घटनाही उघडकीस आल्या होत्या. यामागे घातपात असल्याचा संशय असतांनाच पाकिस्तानातील जिहादी आतंकवादी फरहातुल्ला घोरी याचा १२ मिनिटांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याने आतंकवाद्यांच्या स्थानिक गटांना (‘स्लीपर सेल’ना) भारतीय रेल्वे, इंधन आणि जल वाहिन्या (पाईपलाईन), पोलीस आणि हिंदूंचे नेते यांना लक्ष्य करा, अशी चिथावणी दिली आहे. घोरी सध्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या सूचनेनुसार तेथे राहून भारताविरुद्ध कट रचत आहे. या व्हिडिओमध्ये ‘रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्फोट कसे घडवून आणले जाऊ शकतात ?, हे घोरी सांगत आहे. यासाठी त्याने ‘प्रेशर कुकर’सारख्या वस्तूंपासून बाँब बनवण्याची कल्पनाही मांडली आहे.

१. आतंकवादी घोरी व्हिडिओमध्ये म्हणतो की, भारत सरकारने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबाजवणी संचालनालय यांच्या माध्यमातून आमच्या लोकांची मालमत्ता जप्त केली आहे. बँक खाती सील केली जात आहेत. यासह आमच्या मालमत्तेवर नियमितपणे बुलडोझर चालवला जात आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारला सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे. या सडेतोड प्रत्युत्तरातून त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधावा, आर्थिक साखळी आणि पुरवठा साखळी यांना लक्ष्य करून रेल्वेमार्गांची तोडफोड करावी. यासाठी आधी तुम्हाला स्वत:ला उभे रहावे लागेल, त्यानंतर अनेक पथके तुम्हाला साथ देण्यासाठी सिद्ध होतील. केवळ शस्त्रे उचलणे आवश्यक नाही, तर इतर मार्गांनीही भारताची हानी होऊ शकते. पथकात नव्याने प्रवेश करणार्‍यांचा बुद्धीभेद करा आणि त्यांचा तुमच्या कामासाठी वापर करून घ्या. अन्वेषण यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत, यासाठी प्रत्येक पथकाने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे.

२. फरहातुल्ला घोरीयाने रेल्वे आणि प्रशासकीय व्यवस्था यांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त हिंदूंचे नेते आणि पोलीस यांच्या हत्या करण्याचेही आतंकवाद्यांना सांगितले आहे. यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब करण्यास सांगितले आहे.

३. या व्हिडिओमध्ये रेल्वे रुळ आणि रूळांवर चाकू घेऊन चालणारा तरुण दिसत आहे. एक व्यक्ती पिस्तूलमध्ये गोळ्या भरतांना दिसत आहे.


अक्षरधाम आणि रामेश्‍वरम् कॅफे येथील आक्रमणाचा सूत्रधार !

फरहातुल्ला घोरी जानेवारी मासात बेंगळुरूमधील रामेश्‍वरम् कॅफेमध्या झालेल्या स्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. याखेरीज गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील वर्ष २००२ मध्ये झालेल्या आक्रमणातही त्याचा हात होता. भारतातून मुसलमान तरुणांची भरती करून त्यांना आतंकवादी बनवणे, हे त्याचे मुख्य काम होते. तो अनेक आतंकवादी ‘मॉड्यूल’चा ‘हँडलर’ (स्थानिक आतंकवाद्यांचा सूत्रधार) आहे.

संपादकीय भूमिका

भारतात रेल्वेच्या अपघातांमागील कारणे यातून लक्षात येतात. हा ‘रेल्वे जिहाद’ असून देशातील सर्व प्रकारचे जिहाद मोडून काढण्यासाठी आता कठोर होणे आवश्यक झाले आहे !