आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ !

पंढरपूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर येथील परिसर विस्तीर्ण करण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली आहे. नगरपालिकेने पोलीस प्रशासनासह प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवले. (आतापर्यंत अतिक्रमण का हटवले नव्हते ? – संपादक) व्यापार्‍यांना कोणतीही नोटीस न देता अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. या वेळी प्रांताधिकारी, पोलीस उपाध्यक्ष, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह १०० हून अधिक कर्मचारी, जेसीबी आणि टेंपोसह उपस्थित होते.