मुंबई, १९ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवण्यात येणार आहे. नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी उद्युक्त करण्यासाठी सवलतीच्या दराने रोपांचे वितरण करण्यात येणार आहेत. शासकीय पडीक क्षेत्र, गायरान क्षेत्र, शेतीचे बांध, रेल्वेच्या दुतर्फा, कालव्याच्या दुतर्फा, सामूहिक पडीक क्षेत्र आदी ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यासाठी शासनाकडून शेतकरी आणि वृक्षप्रेमी यांना योग्य दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, यासाठी शाळा अन् महाविद्यालये यांच्या परिसरात रोपांची लागवड करण्यासाठी मागणी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > महाराष्ट्रात राबवली जाणार ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजना
महाराष्ट्रात राबवली जाणार ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजना
नूतन लेख
- विठ्ठलवाडी (जिल्हा ठाणे) येथे नशेखोराचे महिला पोलीस कर्मचार्यावर ब्लेडने आक्रमण !
- खासदार संजय राऊत यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित !
- वक्फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !
- ८ दिवसांत गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधू-संतांसह लाखो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर उतरण्याची चेतावणी
- पर्वरी (गोवा) : आझाद भवनमध्ये श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मसाल्यात रासायनिक भेसळ; ३ धर्मांध कह्यात; मुरबाड येथे वीज पडून तिघांचा मृत्यू !…