सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. भक्ती कुलकर्णी : परम पूज्य, ‘पूर्वी मी संगीताचा सराव करत होते; पण आता आतून मला ‘सराव करावा’ असे वाटत नाही. आता मला ‘साधनाच वाढवायला पाहिजे’, असे वाटते. ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे असे होते का ?’, हे मला कळत नाही.

सौ. भक्ती कुलकर्णी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे त्रासामुळे नाही. आपले एवढे साधक साधनेत पुढे गेले. त्यामध्ये संगीतातील किती आहेत ? साधना करणारेच पुढे गेले ना ? आयुष्यभर गायला, तरी स्वभावदोष दूर होतील का ? नाही ना ? मग ? ‘गायनाची आवड आहे, तरी आता ते नको वाटते. त्यापेक्षा ‘साधनाच करूया. स्वभावदोष निर्मूलन करूया’, असे वाटते’, ते चांगले झाले. फारच छान ! पुढे वाटल्यास संगीतातील साधना करता येईल.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक