पुणे येथून अपहरण केलेल्या युवतीची हत्या करणार्‍या तिघांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – लातूर येथून शिक्षणासाठी पुणे येथे आलेल्या भाग्यश्री सुडे या महाविद्यालयीन तरुणीचे तिच्या मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मित्रांना ती त्यांची नावे सांगेल, या भीतीने तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सुपा परिसरातील एका शेतामध्ये मृतदेह पुरला. आरोपींनी भाग्यश्रीच्या कुटुंबियांना भ्रमणभाष करून ९ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती ‘परिमंडळ ४’चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. (यातून समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे लक्षात येते. – संपादक)